१. प्रापंचिक जबाबदारी
सांभाळून विवेकाने या जन्माची सार्थकता होते.सतत चिंतन,मनन करुन या
जन्मी नव्हेतर याक्षणी मुक्ती प्राप्त करुन घ्यावी असा उपदेश श्रीसमर्थ
करतात.
२. अनुर्वाच्य- जोपर्यंत अहंभाव आहे तो प्रर्यंत ब्रह्मसाक्षात्कार
होत नाही.अहंभाव नाहीसा होणे हीच
अनुभवाची खूण आहे. मीपणाच नाहीसा झाला तर
ब्रह्मस्वरुपाचं वर्णन कसं नि कोण बोलणार? म्हणून ब्रह्म हे ’अनिर्वाच्य’ होय.
३. ब्रह्म हे दृश्याहून भिन्न
आहे,त्या ब्रह्माविषयी बोलणं तो वाच्यांश, त्या बोलण्याचा अर्थ तो
लक्ष्यांश,आणि तो लक्ष्यांश ही
पूर्वपक्षच होय.म्हणून तो मिथ्या होय.
No comments:
Post a Comment